Monday, February 15, 2010

ज्योतिष आणि अध्यात्म...

ह्या वेळी मला ह्या दोन प्राचिन भारतीय हिंदू ज्ञानशाखांवर प्रकाश टाकावा असे वाटले, आधी ह्यावर लिखाण करण्याचे अनेक प्रयत्न मी केले होते परंतू काही कारणास्तव ते पुर्णत्वास जाऊ शकले नाहीत. ह्यावेळी निर्मिकाने साथ दिली व हा लेखन अंश आपल्या हाती आला.
ह्या दोन ज्ञानशाखांबद्दल सामान्य जनांच्या मनात कायमच संभ्रमाचे वातावरण असते. त्या संभ्रमानेच मी कायम अस्वस्थ होतो. आणि त्या संभ्रमाचे कारण दोन्हींही बाबत असलेले एक गुढतेचे वलय हेच आहे असे मला जाणवले. व एकूणच ह्या दोन्हींचा एकत्र काही उपयोग केला जाऊ शकतो का हा विचार माझ्या मनात डोकाऊन गेला. दोन्हीं चा समन्वय साधुन दोन्हींच्या आयुष्याकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनाचा संयोग केला असता. त्यातून जिवन सार्थक बनवण्यास व सुसह्य बनविण्यास नक्कीच होऊ शकेल असे मला वाटले.
अध्यात्म ही ज्ञानशाखा प्रामुख्याने दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करते, ईश्वराचे/विश्वाच्या मुळ कारणाचे ज्ञान व आत्मोन्नती(मुक्ती, सर्वज्ञता, भौतिकतेच्या पलिकडे नेणारे, इ.) आणि ह्या दोन बाबीं मुलत: दोन भिन्न नसून एकाच मार्गात येणारी दोन स्थळे आहेत. ईश्वराचे ज्ञान मिळविण्यासाठी ज्या मार्गावरुन आपण मार्गोत्क्रमण करतो त्या मार्गावर आत्मोन्नती हे स्थळ आहे. व नेमका येथेच अध्यात्माचा ज्योतिष शास्त्राशी संबंध जुळतो. ज्योतिष हे जिवनाच्या भुत-वर्त-भविष्य ह्या अंगांवर दृष्टीक्षेप टाकण्याचे सामर्थ्य आपणांस देते. व जिवनात असलेल्या सर्व भौतिक-अधिभौतिक घटनांचा साक्षीभावाने विचार करण्यास आपल्याला भाग पाडते.
ही साक्षीभावाची संकल्पना श्री जे. कृष्णमुर्ति ह्यांनी फ़ार सुंदर रीतीने सांगितली आहे. आपण आपल्या जिवनाकडे जर स्वत:पासून वेगळे होऊन नि:पक्षपातीपणे पाहिले तर मानवी जिवनाच्या अनेक रहस्यांना उजेडात आणणे आपल्याला शक्य होते. व ह्याच प्रक्रियेमध्ये आपल्याला ज्योतिष मदत करते. ज्योतिषाच्या साहाय्यने आपल्याला आयुष्याचे असंख्य पाकळ्यांचे फ़ुल अलगद फ़ुलतना पाहाता येते व आपल्याला प्रत्येक पाकळी स्वतंत्र ही पाहाता येते.
हा पण येथे ज्योतिष आपण ज्या पारंपारिक(?) पध्दतीने विचारात घेतो ती येथे खचितच उपयोगाची नाही. ज्योतिष ही एक ज्ञानशाखा जी ग्रहांच्या स्थितीचा आणि जिवनाच्या घटनांचा विचार एकाच दिशेने जाणार्या समांतर प्रकाश किरणांसारखा करते. आणि आपल्याला एका प्रकाश किरणाबद्दल गणिताच्या साथीने त्याच्या स्थितीबद्दल निश्चित सांगता येते व दुसर्या बद्दल नाही. पण ते एकाच गतिने जात असल्याने व ते एकमेकांस समांतर असल्याने. एकाच्या स्थितीवरुन आपण दुसर्याच्या स्थितीबद्दल अंदाज करु शकतो.
हाच विचार ज्योतिष्यात ग्रह व जिवनांतील घटनांबद्दल केला जातो. घटनांबद्दल भाकित करता येत नाही. पण ग्रहांची स्थिती गणिताच्या आधाराने सांगता येते. जेणे करुन आपण ग्रहांच्या स्थितीवरुन आयुष्यातील घटनांचा अंदाज बांधतो. ह्यात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कोणीही कोणावरही कसलाही परिणाम करित नाही, किंवा कोणीही कोणाचे छद्मरुप ही घेत नाही. ह्या दोन प्रक्रिया एकमेकांस समांतर चालतात. आणि हीच एक बाब आहे जी आपल्याला ज्योतिष शास्त्राचा वापर करता येण्याच्या मागे आहे. आपल्या पुर्वजांनी मानवी जिवनाशी समांतर अश्या अनेक निसर्गातील चक्रांचा जिवनाबाबत भाकिते करण्यास वापर केलेला आहे. त्यात प्रामुख्याने आपली ओळखी ग्रहज्योतिष्याशी आहे.
मग ह्यातून काही मुलभुत बाबीं समोर येतात. त्या म्हणजे जिवनाची पुर्वनिश्वितता, व आपल्या प्रयत्नवादास असलेल्या मर्यादा. आणि ह्या दोन बाबीं जर आपण स्विकारल्या तर आपल्या जिवनांतील बहुतांश भौतिक समस्या अदृश्य होतात. व आत्मोन्नतीचा मार्ग सुकर होतो.
हा पण ह्याचा अर्थ असा नक्कीच नाही की, आपण दैववादी बनावे. पण ह्या दोन शास्त्रांतील असे कोणते गुण आहेत ज्यांचा प्रयत्नवादा बरोबर धनात्मक बाजूने विचार करता येईल. हा विचार केल्यास माझे उपरोक्त लिखाण आपल्याला रुचेल. विस्तारभयास्तव ह्या लेखाचा काहीच भाग येथे देत आहे.